Premachi Goshta: मुक्ता-सागरचं लग्न झाल्यापासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकाबाजूला मुक्ता-सागरचं प्रेम खुलतं असलं तरी दुसऱ्या बाजूला सावनी-हर्षवर्धनची कुरघोडी सुरुच आहे. अशात मालिकेत लवकर मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

सध्या मालिकेत अजूनही सई नेमकी कोणाची? हर्षवर्धन की सागरची? हाच तिडा सुटलेला नाही. हर्षवर्धनच्या डावाला सागर पूर्णपणे बळी पडला आहे. सागरला अजूनही वाटत आहे की, सई हर्षवर्धनची मुलगी आहे. त्यामुळे आजच्या भागात सागर पुन्हा दारू पिऊन सावनीच्या घरी तमाशा करता पाहायला मिळणार आहे. सावनीचा हात पकडून तिला विचारतो, “खरं सांग, सई आपलीच मुलगी आहे ना?” पण सावनी त्याला ढकलून देते आणि सागर खाली पडतो.

ipl 2024 dhruv jurel salute his father ekana stadium wins heart sanju samson rr vs lsg
VIDEO : मुलगा धुव्र जुरेलची प्रत्यक्ष खेळी पाहून गर्वाने फुलली सैनिक वडिलांची छाती; मुलाचीही अर्धशतकाद्वारे वडिलांना सलामी!
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

त्यानंतर याबाबत सावनी मुक्ताला फोन करून सांगते. तेव्हा मुक्ता मध्यरात्री सागरला घेण्यासाठी सावनीच्या घरी जाते. यावेळी सावनी संपूर्ण घडलेली घटना खोटी रंगवून मुक्ताला सांगते. सागरने तिचा गळा पकडला, मारलं, असं मुक्ताला सांगते. हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. पण मुक्ता सगळं ऐकून सागरला व्यवस्थित घरी घेऊन येते. मुक्ता सागरला समजवते. सावनीला विसरा आणि सईच्या प्रेमाचा स्वीकार करा, असं सागरला सांगते. या सर्व नाट्यानंतर मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. सागरचा मोठा मुलगा आदित्यची एन्ट्री होणार आहे.

हेही वाचा – अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच ज्येष्ठ अभिनेत्रीची खास पोस्ट, म्हणाल्या, “माझ्या अपघातानंतर…”

‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढील भागात काय घडणार आहे? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आदित्य सागरला फोन करून बोलतो की, मी सावनी मम्माकडे आहे. तुम्ही तिथे मला भेटायला या. त्यानंतर सागर फोन ठेवून म्हणतो, “मला असं वाटत, काहीतरी त्याच्याबरोबर वाईट घडणार आहे.” मग सागर आदित्यला भेटण्यासाठी सावनीच्या घरी जातो. तेव्हा हर्षवर्धन सागरला म्हणतो की, तुला ही फाइल घेऊन आदित्यने बोलावलं आहे. थोड्याच वेळ भेटायचं हा. तुझी वेळ आता सुरू झाली. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर आदित्यला भेटल्यानंतर सागरची रिअ‍ॅक्शन काय असते? हर्षवर्धनने दिलेल्या फाइलमध्ये नेमकं काय असतं? हे येत्या काळात समजले.

हेही वाचा – गौतमी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्ताने नवरा स्वानंद तेंडुलकरची खास पोस्ट, म्हणाला, “तू माझ्या पाठीशी…”

दरम्यान, तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. आता या मालिकेतील मुक्ता, सागर, सई ही पात्र प्रेक्षकांच्या आपल्या घरातील वाटतं आहेत. त्यामुळे ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.