‘शिवा’ (Shiva) व ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकांचा महासंगम सुरू असून, या मालिका प्रेक्षकांना एकत्र भेटायला येत आहेत. सूर्या व शिवा दोघे एकमेकांचे बालपणीचे मित्र-मैत्रीण आहेत. त्यांच्यात एक वेगळेच नाते असल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र सूर्या व शिवा यांच्या मैत्रीमध्ये फूट पडणार आहे. याला डॅडी कारणीभूत असणार आहेत, असे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. शिवा व तिचे कुटुंब त्यांच्या जमिनीबाबत ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, ते दूर करण्यासाठी साताऱ्याला आले आहे. आता समोर आलेल्या प्रोममध्ये पाहायला मिळते की, शिवाच्या आजीची जमीन ही जालिंदर म्हणजेच डॅडींनी बळकावली आहे. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू आहे. शिवाची आजी डॅडींना म्हणते, “तुझ्याकडून माझी जमीन माघारी घेतल्याबिगर मी इथनं माघारी जाणार नाही, एवढं ध्यानात ठेवायचं.” आजीच्या या बोलण्यानंतर डॅडी एक मूठभर माती घेऊन, ती माती आजीच्या हातात ठेवतात आणि म्हणतात, “ही घे जमीन, एवढीच लायकी आहे तुझी.” आशूचा मित्र शिवाच्या आजीला तिथून घेऊन जातो. तितक्यात शिवा येते तिने शत्रूला पकडलेले असते. डॅडींसमोर ती त्याला ढकलून देते. रागात डॅडींना म्हणते, “ए जालिंदर, माझ्या आजीच्या जमिनीचे पेपर इथे टाकायचे.” त्यावर डॅडी म्हणतात, “तुझी तेवढी लायकी नाही” हे ऐकल्यानंतर शिवा थेट डॅडींची कॉलर धरते. शत्रू व डॅडी हे बघून ओरडतात. तितक्यात सूर्या येतो आणि शिवाला म्हणतो, “शिवा कॉलर सोड, शिवा त्याला म्हणते, “नाही सोडत काय करतोस ते कर”

इन्स्टाग्राम

‘झी मराठी’ वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना, ‘जमिनीसाठीचा संघर्ष शिवा आणि सूर्याच्या मैत्रीत दुरावा आणेल का…?’, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावरील हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षक खूश असल्याचे त्यांनी केलेल्या कमेंट्समधून दिसत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “आजचा एपिसोड दमदार होता. या महासंगमच्या शेवटी अपेक्षा आहे की, दोन्ही मालिकांमध्ये गेल्या आठवड्यात जे नकोसं वळण आलं आहे, ती संपून जाईल. कारण- शिवामुळे जालिंदरचं सत्य सूर्याला कळायला हवं आणि सूर्यानं शिवा कशी चांगली आहे हे आशूला पटवून द्यायला हवं. तर अजून भारी वाटेल.” दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिले, “रॉक शिवा.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “सूर्यादादा, ती शिवा आहे.”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे डॅडी ही श्रीमंत, गावात मान असलेली; पण धूर्त व्यक्ती आहे. डॅडी वर्षानुवर्षे सूर्याचादेखील वापर करून घेतो; मात्र ते त्याला समजत नाही. डॅडींप्रति त्याला आदर आहे. त्यांच्याविरुद्ध तो कोणाचे काहीही ऐकून घेतो. त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार होतो. डॅडी याचा फायदा घेतात. आता त्याच्याशी चांगले वागून, त्यांनी त्याला फसवण्याचे कटकारस्थान केल्याचे पाहायला मिळत आहे. तेजूचे लग्न ज्या मुलाबरोबर ठरवले आहे, त्याला डॅडींनी आणले आहे. ऐन वेळी समीर ऊर्फ पिंट्याच्या जागी शत्रू लग्नात बसणार आणि तेजूबरोबर लग्न करणार, असा त्यांचा प्लॅन आहे. दुसरीकडे शिवा व आशू यांच्यामध्ये पुन्हा एकदा दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा दुरावा दिव्यामुळे तयार झाला आहे.

हेही वाचा: Bigg Boss स्पर्धकाने बांधली लग्नगाठ! सामाजिक कार्यकर्ती आहे पत्नी, फोटो आले समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता शिवा व सूर्या यातून कसा मार्ग काढणार, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.