Akshaya Naik on Working In Serials: अभिनेत्री अक्षया नाईकने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ तसेच ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांमध्ये केले आहे. तिच्या या मालिकांतील भूमिकांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले.

अक्षया नाईक काय म्हणाली?

आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत कलाकारांनी मालिकेत काम करणे का महत्वाचे आहे, यावर वक्तव्य केले आहे. याबरोबरच, कलाकारांच्या दिसण्याबाबतही अक्षयाने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. नुकतीच अभिनेत्रीने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलाल मुलाखत दिली.

या मुलाखतीत अक्षया नाईक म्हणाली, “मला असे बरेचसे कलाकार माहित आहे, ज्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला मालिकेत काम करायचं नाही. आम्ही ओटीटीवरच काम करणार. आम्ही चित्रपटात काम करणार, मालिकेत काम करणार नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. पण, मला स्वत:ला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने एकदा तरी, कमीत कमी सलग तीन महिने मालिकेत काम केलेच पाहिजे.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मालिकेत काम केल्याने तुमची सगळ्या प्रकारची चाचणी होते. शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक अशा सगळ्या पातळ्यांवर तुमची टेस्ट होते. कारण-१२ तासांची शिफ्ट असते. कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये १२ तास काम करत नाहीत. फक्त आपल्या इंडस्ट्रीमध्ये १२ तास काम होतं. बारा तासातील कमीत कमी ८ तास तुम्ही सेटवर उभे राहणार आहे. त्यामुळे शरीराने तुम्हाला साथ देणे गरजेचे असते. “

अक्षया नाईक पुढे म्हणाली, “लोक असे म्हणतात की कलाकार आहेत तर डाएट करतात, जीमला जातात. तर कलाकाराची ती गरज आहे. आम्हाला हे करावे लागते. आम्ही पार्लर जातो, हेअर स्पा करतो. तर लोक म्हणतात हे कलाकार मेकअप करतात. पण, जर एखादा कलाकार सामाजिक नियमांप्रमाणे जर चांगला दिसत नसेल, त्याला नावे ठेवली जातात.”

दरम्यान, अक्षया नाईकने या मुलाखतीत सोशल मीडियावरबाबत वक्तव्य केले आहे. सोशल मीडिया सध्या काळाजी गरज असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. अक्षया नाईक सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. मालिकांसह अभिनेत्री नाटकातदेखील काम करताना दिसली आहे. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.