मुंबई : आरोग्य विभागात ‘गट ब’मधील पदांवर कार्यरत असलेल्या जवळपास ८०० वैद्याकीय अधिकाऱ्यांना सरकारने मागील अनेक वर्षांपासून पदोन्नती दिलेली नाही. यातील अनेक अधिकारी पदोन्नतीशिवायच निवृत्त झाले असून, आरोग्य विभागातील ‘सनदी अधिकारी’ नेमके काम काय करतात, असा सवाल डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

तब्बल २३ वर्षे आमची सेवाज्येष्ठता यादी करण्यात आली नाही. दोन वर्षांपूर्वी सेवाज्येष्ठता यादी तयार करून आरोग्य सचिवांकडे ही यादी पाठविण्यात आली, तरीही आमची पदोन्नती केली जात नसल्याने आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालयांत ‘गट ब’ संवर्गातील अधिकारी कार्यरत आहेत. राज्यात आरोग्य विभागातील विविध कार्यालयांमध्ये जवळपास १२५० वैद्याकीय अधिकारी कार्यरत होते. या सर्वांना शासकीय नियमानुसार नियुक्तीनंतर तीन वर्षांनी पदोन्नती मिळणे गरजेचे असतानाही गेली २७ वर्षे पदोन्नती दिलेली नाही.

२४ वर्षांची सेवा पूर्ण

●अनेक वैद्याकीय अधिकारी आता निवृत्त झाले असून काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. सध्या ‘गट ब’ संवर्गामध्ये जवळपास ८०० वैद्याकीय अधिकारी कार्यरत आहेत. नियुक्ती झाल्यापासून त्यांना एकदाही पदोन्नती मिळालेली नाही.

● काही वैद्याकीय अधिकाऱ्यांची २४ वर्षांची सेवा पूर्ण झाली आहे. अलीकडेच या वैद्याकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही वस्तुस्थिती आणून दिल्यानंतर लवकरात लवकर आपल्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे डॉ अरुण कोळी यांनी सांगितले.

●आजघडीला आरोग्य विभाग सनदी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. आरोग्य विभागात दोन सचिव तसेच आयुक्त असे सनदी अधिकारी असतानाही २७ वर्षांपासून ८०० डॉक्टरांना पदोन्नती मिळालेली नाही. डॉक्टर, परिचारिकांची शेकडो पदे रिक्त राहात असतील, तसेच आरोग्य संचालक स्तरावरील कारभार हंगामी तत्त्वावर चालत असेल तर रुग्णांचे आरोग्य राखायचे कसे, असा सवालही डॉक्टर उपस्थित करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भेदभाव करणे चुकीचे’

२०२३ मध्ये गट ब मधील या वैद्याकीय अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. त्यानंतर आरोग्य संचालकांनी ही यादी आरोग्य मंत्रालयातील सचिवांकडे पाठवून दिली त्यालाही आता वर्ष उलटून गेले आहे. सचिवांच्या कार्यालयाचे किती वेळा उंबरठे झिजवले याची गणती नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांमधील वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ असा भेदभाव करणे चुकीचे असून सर्वांनाच एका वर्गात आणणे आवश्यक असल्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.