लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याचा, तसेच तो कीर्तिकर यांच्यासोबत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. प्रचारयात्रेत कीर्तिकर यांच्या जवळ इक्बाल मुसा असल्याची छायाचित्रे आणि चित्रफित भाजपचे आमदार अमित साटम यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. त्यामुळे वायव्य मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, कीर्तिकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
Rajan Vichare warn to the Chief Minister Eknath shinde says do not mess with me
“नादी लागू नका, प्रकरणे बाहेर काढेन”, राजन विचारे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”

महाविकास आघाडीने शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांना वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवार देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर भाजप शिवसेना महायुतीने शिंदे शिवसेनेचे रवींद्र वायकर उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात कीर्तिकर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोप इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान बुधवारी कीर्तिकर यांच्या प्रचारफेरीत दिसला, असा आरोप भाजपचे अंधेरीतील आमदार अमित साटम यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचे समर्थन घेताना दिसत असल्याचा आरोप साटम यांनी केला आहे.

आणखी वाचा- शिवाजी पार्क मैदानातील सभेसाठी मनसेला परवानगी, १७ मे रोजी भाजप आणि महायुतीचा मेळावा

दरम्यान, ठाकरे गटाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा आरोप खोडसाळपणाचा आहे. प्रचारयात्रेमध्ये चारशे – पाचशे लोक येतात, जवळ येऊन स्वत:ची ओळख करून देतात. त्यातील सगळ्यांना उमेदवार व्यक्तीश: ओळखत नसतात. जर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटातील आरोपी आहे, तर मग तो बाहेर कसा असा सवाल ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील निवडणूक प्रतिनिधी राजेश शेट्ये यांनी केला आहे.