गेले काही दिवस मृत्युशी झुंजणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मातोश्री या निवासस्थानी मालवली. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे लिलावती इस्पितळाचे डॉ. जलील परकार यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली. त्यानंतर उपस्थित शिवसैनिकांचा शोक अनावर झाला. पोलिसांनी मातोश्रीभोवतीच्या बंदोवस्तात वाढ केली आहे.

दुपारी साडेतीन नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिलासह मातोश्रीवर दाखल झाले, त्यानंतर भाजपनेते गोपीनथ मुंडे , विनोद तावडे आदि नेते मंडळी एका नंतर एक मातोश्रीवर दाखल होण्यास सुरूवात झाली,दुपारी ४: ५५ मिनीटांनी डॉ. जलील परकार यांनी बाळासाहेबांचे निधन झाल्याचे जाहीर केले. नंतर खासदार संजय राऊत यांनी देशवासीयांनी शांतता राखावी असे आव्हान केले आहे

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
Arvind Kejriwal Tihar Jail
अरविंद केजरीवाल यांना १४ दिवस तुरुंगात राहावे लागणार; तिहारमध्ये काय मिळणार? कोणाला भेटण्याची परवानगी?
Sunetra Pawar
रायगड : सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला…

* भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी छत्रपती शिवाजी महाराज हे बाळासाहेबांचे दैवत होते. राजा शिवाजी महाराजांसारखा असावा आणि राज्य शिवशाहीसारखे असावे, असे ते म्हणत. बाळासाहेबांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. आमचा कुटुंबप्रमुखच गेला आहे. महाराष्ट्रात आणि देशात शिवशाहीचे राज्य यावे हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.