मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या असं आव्हान आज उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आणि एकनाथ शिंदे सरकारला दिलं आहे. ज्यावर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पोस्ट लिहित जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच तुमच्या पराभवाची तुतारी, हार आणि सोनेरी पेढे यांची ऑर्डर दिली आहे असंही म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी

उध्दवजी…

kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Loksatta vyaktivedh Madhura Jasraj Paraphrase of V Shantaram autobiography movie
व्यक्तिवेध: मधुरा जसराज
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Amitabh bachchan Jaya Bachchan
अमिताभ बच्चन यांच्या अफेअर्सबद्दल बोलायला त्यांच्या सासऱ्यांना आलेलं निमंत्रण, ‘अशी’ होती जया यांच्या वडिलांची प्रतिक्रिया
Exploding notes in Anand Ashram Dighe confidant Nandkumar Gorule was enraged
आनंद आश्रमात नोटांची उधळण, दिघे साहेबांचे विश्वासू नंदू गोरूले संतापले, म्हणाले…
Yograj Singh Shares Incident of His Father Said My Father Killed a Tiger Smeared its blood on my lips and Forehead
Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा
Chhattisgarh Naxal Attck
Chhattisgarh : पोलिसांचे खबरी समजून नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांना फासावर लटकवलं, छत्तीसगडमधील संतापजनक घटना

मुंबई महापालिकेची निवडणूक झालीच पाहिजे, लवकर झाली पाहिजे… या आपल्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

म्हणूनच तुम्ही वॉर्ड रचनेबाबत आपले बगलबच्चे राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी केलेल्या याचिका मागे घ्या…

तुम्ही जे घालवलेत त्या ओबीसीच्या आरक्षणाची याचिका ही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे..त्याचा निकाल न लागता, ओबीसीना आरक्षण न देता तुम्हाला निवडणुका हव्यात का?

आमच्या ओबीसींच्या पाठीत असा खंजीर खुपसणार का ? असा छुपा अजेंडा घेऊन का येताय? ” मर्दा” सारखे मैदानात या..

भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज आहेत.

मी तर तुमच्या पराभवाचे ढोल, तुतारी आणि सोनेरी पेढ्यांची ऑर्डर देऊनच ठेवलेय.

तुमचे बोलघेवडे आणि आमचे ध्येयवेडे अशी लढत होऊनच जाऊ द्या..

लक्षात ठेवा विजय नेहमी ध्येयवेड्यांचाच होतो!

छत्रपतींचा आशीर्वाद मुंबईकरांची भाजपालाच साथ!

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“राजस्थान, छत्तीगसड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. एवढी तुमची लाट असेल, तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. आमच्याही मनात काही शंका नको. सगळं वातावारण विरोधात आहे. एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. मग, हे कसं घडलं? हा प्रश्न मतदारांना पडत असेल. ती शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक दम असेल, तर बॅलेट पेपरवर घ्या.”