मुंबई : भारत-पाकिस्तानमधील १९७१ च्या युद्धाच्या वेळी आम्ही गुजरात बंदरावर होतो. नेमके काय करायचे ते आम्हाला माहीत नव्हते. युद्धनौकेवर असताना वरिष्ठांनी आमच्या हाती आदेश ठेवला. कराचीवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते. आम्ही पाकिस्तानच्या ‘मुहाफिज’ युद्धनौकेवर हल्ला चढविला आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले, असे त्यावेळी आयएनएस वीर युद्धनौकेवर उपस्थित असलेले निवृत्त लेफ्टनंट कमांडर आय. जे. शर्मा यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या युद्धाला ५० वर्षे झाली. पाकिस्तानच्या सागरी तळावर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकाच्या ताफ्याला ‘किलर्स स्क्वॉड्रोन’ असे नाव देण्यात आले होते. या ताफ्याच्या मानांकन प्रदान सोहळ्याला १९७१ च्या युद्धात सहभागी नौदलाचे जवानही उपस्थित होते. यावेळी त्यांनी युद्धातील आठवणींना उजाळाही दिला. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bring back memories of the 1971 war akp
First published on: 09-12-2021 at 00:12 IST