गेल्या काही दिवसांपासून वारंवार तांत्रिक बिघाडांमुळे होणारा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाला. मध्य रेल्वेच्या शहाड आणि कल्याण या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याने सकाळाच्या वेळेत आपापली कार्यालये गाठण्याची घाई असलेल्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत रूळाला तडे जाणे, ओव्हरहेड वायर तुटणे अशा काही कारणांमुळे मध्य रेल्वेची सेवा अनेकदा खंडित होताना दिसली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway running late due to technical difficulty
First published on: 11-09-2014 at 09:18 IST