टिटवाळा – आंबिवली दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक पूर्वपदावर आली आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास टिटवाळा-आंबिवली दरम्यान रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. ऐन वर्दळीच्यावेळी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यानंतर तासाभराने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, पण वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यास भरपूर वेळ गेला. मध्ये रेल्वेवरील लोकल सेवा २५ मिनिटे उशीराने सुरू होती. तर, मुंबईच्या दिशेने येणाऱया लांबपल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crack in railway track central railway disturb
First published on: 18-11-2015 at 09:12 IST