मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर, तसेच उपनगरांत दमदार हजेरी लावली. दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन तास मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईत पावसाने दडी मारली होती. मात्र, शुक्रवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला. तसेच पुढच्या काही तासांत मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन तास मुंबई, तसेच ठाण्यात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे. तसेच कोकण पश्चिम किनारपट्टीवर मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत.गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढलो होते. परिणामी, नागरिकांना उकाडा सहन करावा लागत होता. पावसाने शुक्रवारी हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पहाटेपासून पावसाचा जोर वाढला. दरम्यान, पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये पाणी साचले. परिणामी, या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सानपाडा, सीव्हूड-दारावे, खारघर, खांदेश्वर या भागात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, पुढील पाच पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.