मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ होऊन वातावरणातील गारवा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईतील तापमानात दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा कमी होऊन दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विभोक्षाच्या (थंड वाऱ्याचा झंझावात) प्रभावामुळे मुंबईत गुरुवारपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज असून, या कालावधीत मुंबईतील काही भागांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागातही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच किमान तापमानातील चढ – उतार कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
weather department expressed possibility of increasing heat in Mumbai for next one or two days
मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता

होही वाचा…नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे

दरम्यान, उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. त्यामुळे थंडीमध्ये चढ-उतार होत असून, काही भागात दाट धुके कायम आहे. राज्यातील किमान तापमानातही काही अंशी घट- वाढ होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच ढगाळ वातावरणाचा देखील थंडीवर परिणाम होत आहे. त्यामुळे दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Story img Loader