लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गिरण्यांच्या जमिनीवर साकारण्यात येणाऱ्या गृहयोजनेत १ ऑक्टोबर १९८१ पर्यंत काम करणाऱ्या गिरणी कामगारांना सामावून घ्यावे अशी मागणी गिरणी कामगार कर्मचारी निवारी आणि कल्याणकारी संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्यासाठी गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी १ ऑक्टोबर १९८१ अशी पात्रता मुदत ठेवण्याची मागणी आहे.

मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
prahar association protest in front of collectors office for various demands of disabled
नाशिक : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन
Nitin Gadkari Inauguration ceremony of development works held at Karvenagar Attendance of BJP workers is low
गर्दी जमविण्यासाठी भाजप ‘दक्ष’; गडकरींच्या सभेला अल्प उपस्थितीनंतर पदाधिकाऱ्यांना जाग
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
sharad pawar
शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…
Aditya Thackeray demands that salaries of municipal workers and employees should be paid within stipulated time
महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचे पगार विहित वेळेत द्यावे, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी

राज्य सरकारने गिरण्यांच्या जमिनीवरील गृहयोजनेसाठी १ जानेवारी १९८२ नंतरचे कामगार पात्र ठरविले आहेत. १८ जानेवारी १९८२ रोजी गिरणी कामगारांचा लाक्षणिक संप सुरु झाला. त्यामुळे १ जानेवारी १९८१ नंतरचे कामगार पात्र ठरविण्यात आले आहेत. पण त्याचवेळी १ ऑक्टोबर १९८२ मध्ये संप पुकारलेल्या आठ गिरण्यांमधील कामगारांना गृहयोजनेचा लाभ घेता येत नसल्याचे दिसते आहे. हिंदूस्थान मिल-ए, हिंदूस्थान मिल-बी, हिंदूस्थान मिल-क्राऊन मिल, हिंदूस्थान मिल-प्रोसेस हाऊस, स्टॅंडर्ड मिल टेक्सटाईल (प्रभादेवी), प्रकाश कॉटन मिल, श्रीनिवास मिल आणि मधुसूदन मिल अशा या आठ गिरण्या आहेत. त्यातील कामगारांना ही घरे मिळावीत यासाठी गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीसाठी १ ऑक्टोबर १९८१ ही तारीख पात्रता मुदत (कट ऑफ डेट) निश्चित करावी अशी मागणी कल्याणकारी संघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांची तांत्रिक चौकशी, तीन-चार दिवसात खड्डा बुजवला जाणार

या गिरण्यांमधील कामगारांची संख्या खूप आहे. तेव्हा त्यांनाही संधी द्यावी, अनेक गिरणी कामगार काही ना काही कारणाने घरांच्या योजनेसाठी म्हाडाकडे अर्ज करू शकलेले नाहीत अशा कामगारांना संधी द्यावी, अशा मागण्या कल्याणकारी संघाने केल्या आहेत.