मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या ‘हरिजन सेवक संघा’च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर कुमार संन्याल यांनी जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतिगृहे आणि शाळा चालविल्या जातात. ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, अभ्यासिका चालविल्या जातात.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसाराचे कार्य हरिजन सेवा संघातर्फे करण्यात येते, त्याचा विस्तार आगामी काळात केला जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले. हरिजन सेवक संघाच्या स्थापनेला यंदा ९३ वर्षे झाली आहेत. याआधी गांधीवादी नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी हे महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्षपद होते.