Mumbai Water Supply Today Latest Updates: मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे व भिवंडी – निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रातील तांत्रिक कामासाठी पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, पावसाची शक्यता लक्षात घेऊन कामे स्थगित करण्यात आली आहेत. त्यामुळे पाणी कपातही रद्द करण्यात आली आहे.
पांजरापूर येथील उदंचन केंद्रातीत टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी कार्यान्वित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे ते काम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आज जाहीर करण्यात आलेली पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शहर तसेच पूर्व उपनगरवासियांना दिलासा मिळाला आहे.
प्रतिकूल हवामान आणि पावसाच्या अंदाजामुळे पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ वरील दाबवाढ नियंत्रण टाकी कार्यान्वित करण्याचे काम प्रशासनाला शक्य होणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पूर्वी घोषित केलेल्या पाणीकपातीचा परिणाम शहर आणि पूर्व उपनगरातील अनेक परिसरांवर होणार होता. मात्र, दाबवाढ नियंत्रण टाकीचे काम रद्द करण्यात आल्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील संबंधित विभागांचा पाणीपुरवठा दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे सुरळीत राहणार आहे.