मुंबई: मुंबईतील महापालिका रुग्णालये, राज्य शासनाचे जे.जे. रुग्णालय तसेच टाटा कॅन्सर रुग्णालयात केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. हे रुग्ण व रुग्णांबरोबर येणारे नातेवाईक तसेच मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे एक लाख गरजू लोकांना दररोज मोफत जेवण देण्याचा संकल्प ‘अक्षय चैतन्य’ या संस्थेने केला असून आगामी वर्षापासून हा अन्नदानाचा महायज्ञ सुरु केला जाणार आहे.

अक्षय चैतन्यच्या वतीने आजही वेगवेगळ्या घटकांना दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते. २०२७ च्या अखेरीस, दररोज एक लाख लाभार्थ्यांना अन्न सेवा देण्याचे अक्षय्य चैतन्यने निश्चित केले आहे. ज्यामध्ये ७५० हून अधिक शाळांमधील बालवाडी आणि माध्यमिक इयत्तेतील (९वी आणि १०वी) ८३,००० मुले तसेच मुंबईतील ५० हून अधिक सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या १७,००० कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. हा प्रकल्प मुंबई आणि देशासाठी चांगले आरोग्य आणि शिक्षण मिळवण्यासाठी तसेच गरजूंच्या पोषणाची पुरेपुर काळजी घेईल. या परिवर्तनकारी उपक्रमाबाबत विचार करताना, अक्षय चैतन्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास परचंद म्हणाले की, मुंबई पोर्ट ट्रस्टने दिलेली ही जमीन हा आमच्या उपक्रमासाठी सर्वात मोठी भेट ठरणार आहे. मुंबईत कोणाही उपाशी पोटी झोपणार नाही, असे आमचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल ठरणार आहे.

मुंबईतील ‘अक्षय चैतन्य’ यासेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्न लक्षात घेऊन मुंबई पोर्ट अथॉरिटीने भायखळा येथील घोडापदेव येथे ३०,००० चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे, ज्याठिकाणी भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर विकसित केले जाणार आहे. या अत्याधुनिक किचनमध्ये दररोज १,००,००० गरजूंना पौष्टिक आहार पुरवण्याची क्षमता असेल. या ऐतिहासिक प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा समारंभ सोमवारी पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली. या समारंभात भायखळ्याचे आमदार मनोज पांडुरंग जमसुतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर हरे कृष्ण चळवळीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अक्षय पात्र यांच्या हस्ते अमितासन दासा यांनी याठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मुंबई पोर्ट अथॉरिटीचे मुख्य अग्निशमन अधिकारी इंद्रजित चड्डा, मुंबई पोर्ट अथॉरिटीचे इस्टेट मॅनेजर जी.ए. शिरसाट; मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचे दिलीप शेडकर , टीएलसी लीगलचे मॅनेजींग पार्टनर विपिन जैन; व्हीव्हीएफ ग्रुपचे सीएमडी रुस्तम गोदरेज जोशी; महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय शेंडे आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे अमित नबीरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टीएलसी लीगल आणि व्हीव्हीएफ ग्रुप यांनी मुंबईतील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि पोषक आहार पुरविण्याकरिता, स्वयंपाकघरातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला. विपिन जैन सांगतात की, मुंबईतील अक्षय चैतन्य सारख्या सेवाभावी संस्थेसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. दररोज एक लाख लाभार्थ्यांना पोषक आहार पुरविण्याचे त्यांचे ध्येय्य य खरोखरच प्रेरणादायी आहे. रुस्तम गोदरेज जोशी(अध्यक्ष आणि एमडी, टीएलसी लीगल) सांगतात की, मुंबईतील हजारो लोकांसाठी सुरक्षित आणि पोषक आहार बनवून ज्यांना त्याची सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या या अक्षय चैतन्यच्या मोहिमेला आमचा पाठिंबा असून या मोहिमेचा मला अभिमान वाटतो.

अक्षय चैकन्याच्या माध्यमातून मे २०२५ मध्ये बांधकाम सुरू करुन जानेवारी २०२६ पर्यंत किचनचे काम पूर्ण केले जाणार आहे. ५०,००० चौरस फूटाच्या जागेत सर्वसमावेशक सुविधा, २१० किलोवॅट क्षमतेची मजबूत सौरऊर्जा हा उपक्रमात यशस्वीरित्या पार पाडण्यात फायदेशीर ठरतील . शून्य-कचरा धोरणाचा वापर करुन तयार होणाऱ्यापासूम खत तयार केले जाणार आहे. हा उपक्रम केवळ हा गरजूंची भूक मिटविणाबरोबरच आणि पर्यावरणासही तितकाच हितकारक असणार आहे. २०२७ च्या अखेरीस दररोज एक लाख लाभार्थ्यांना सेवा पुरविण्याचे अक्षय्य चैतन्यचा मुळ उद्देश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमाला टिएलसी लीगल, रिलायन्स फाउंडेशन, अँकर बाय पॅनासोनिक, महानगर गॅस लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, ज्वेलेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंडिकॅरेस फाउंडेशन, केअरस्ट्रीम, ऑर्बिट एक्सपोर्ट्स, एमआरव्हीसी, सेव्हेक्स टेक्नॉलॉजीज, व्हीव्हीएफ ग्रुप आणि लॉयड्स ग्रुप यासारख्या प्रतिष्ठित कॉर्पोरेट भागीदारांचे सहकार्य लाभले आहे. आदेश तितरमारे(मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष) सागंतात की, अक्षय चैतन्यच्या या मोहिमेचा आम्हाला अभिमान वाटतो. हा उपक्रम समाजाचे कल्याण आणि विकासासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. अक्षय ऊर्जा आणि शून्य-कचरा यासारख्या पर्यावरण पुरक पर्यायांचा वापर करून, हा प्रकल्प केवळ भूक मिटवत नाही तर मुंबईसाठी एक उत्तम भविष्य देखील घडवून आणत आहे. हे स्वयंपाकघर हजारो गरजूंसाठी आशेचा किरण ठरणार आहे.