विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत धोरण निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत व्यक्त केले.
कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी) यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना खडसे यांनी आगीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची नियमात तरतूद नाही, पण सहानुभूतीपूर्वक या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. रायगडसह राज्याच्या विविध भागांमध्ये आगींमुळे शेतीमालाचे नुकसान होते तेव्हा मदतीच्या धोरणात बदल करण्याची मागणी सुभाष पाटील (शेकाप ) यांनी केली. तसेच वणवे लागू नयेत म्हणून उपाय योजण्याची मागणी त्यांनी केली. कोकणावर अन्याय होत असल्याचा मुद्दा नीतेश राणे (काँग्रेस) आणि वैभव नाईक (शिवसेना) यांनी मांडला.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2015 रोजी प्रकाशित
शेतीमाल मदतीचे धोरण निश्चित करण्याची आवश्यकता – खडसे
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत धोरण निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत व्यक्त केले.

First published on: 14-03-2015 at 05:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Package for rain hit farmers before session ends eknath khadse