शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे आमदार आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची ताकद अलिकडच्या काळात वाढली असल्याचं पहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसमोर मनसेचं आव्हान निर्माण होऊ शकतं. कारण मनसे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे वरळीतून विधानसभेची निवडणूक लढू शकतात.

संदीप देशपांडे यांनी वरळी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, टीव्ही ९ मराठीने संदीप देशपांडे वरळी विधानसभेची जागा लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. संदीप देशपांडे यांनी आज (१९ मार्च) वरळीतल्या बीडीडी पुनर्विकासातील रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी शेकडो रहिवासी उपस्थित होते.

Magathane, uddhav thackeray group,
मुंबई : मागाठाण्यात ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेविका शिंदे शिवसेनेत
uddhav thackeray
शिवसेना ठाकरे गटाचा तीन ऑगस्टला पुण्यात मेळावा; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती
Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
Narayan Rane, Vinayak Raut,
नारायण राणे यांच्या खासदारकीला विनायक राऊत यांचे आव्हान
Kalyan East Assembly Constituency BJP aspirant Narendra Pawar from Kalyan Paschim is likely to get candidature print politics news
कारण राजकारण: शिंदे गायकवाड बेबनावामुळे पवारांचे ‘कल्याण’?
It will be difficult for Aditya Thackeray to contest from Worli in the Lok Sabha elections print politics news
कारण राजकारण: आदित्य ठाकरेंसाठी वरळी यंदा कठीण?
What Sanjay Raut Said About Ravindra Waikar?
“आता फक्त दाऊदला क्लीन चिट…”, रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊत यांचा टोला
Political discussion with Abdul Sattar Nagesh Patil Ashtikar visit to Mumbai
सत्तार, अष्टीकर आणि बांगर भेटीने चर्चेला उधाण

हे ही वाचा >> दिल्लीतलं वातावरण तापलं, पोलीस राहुल गांधींच्या घरी दाखल; चौकशीबाबत विचारताच म्हणाले, “थोडा वेळ…”

शिवसेनेचा बालेकिल्ला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे या मतदार संघातून विजयी झाले. गेल्या अनेक वर्षांपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. १९९० ते २००९ या काळात शिवसेनेचे दत्ताजी नलावडे येथील आमदार होते. २००९ मध्ये ही जागा काँग्रेसच्या सचिन अहीर यांनी जिंकली. तर २०१४ मध्ये ही जागा पुन्हा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी वरळीत भगवा फडकवला. तर २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी तब्बल ८९,२४८ मतांसह मोठा विजय मिळवला. येथे राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना केवळ २१ हजार मतं मिळाली होती.