शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे आमदार आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची ताकद अलिकडच्या काळात वाढली असल्याचं पहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसमोर मनसेचं आव्हान निर्माण होऊ शकतं. कारण मनसे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे वरळीतून विधानसभेची निवडणूक लढू शकतात.

संदीप देशपांडे यांनी वरळी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, टीव्ही ९ मराठीने संदीप देशपांडे वरळी विधानसभेची जागा लढवू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. संदीप देशपांडे यांनी आज (१९ मार्च) वरळीतल्या बीडीडी पुनर्विकासातील रहिवाशांसोबत संवाद साधला. यावेळी शेकडो रहिवासी उपस्थित होते.

Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे
Shrikant Shinde appeal
कल्याण लोकसभेत व्यक्तिगत कारणांसाठी महायुतीचे वातावरण खराब करू नका, आमदार गायकवाड समर्थकांना खासदार शिंदेंचे आवाहन
Satyajit Patil Sarudkar
महाविकास आघाडीच्या ताकदीवर निवडून येणार; सत्यजित पाटील सरूडकर यांना विश्वास
Sushilkumar Shinde
सुशीलकुमार शिंदे यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशेब द्यावा, आमदार राम सातपुते यांचे आव्हान

हे ही वाचा >> दिल्लीतलं वातावरण तापलं, पोलीस राहुल गांधींच्या घरी दाखल; चौकशीबाबत विचारताच म्हणाले, “थोडा वेळ…”

शिवसेनेचा बालेकिल्ला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे या मतदार संघातून विजयी झाले. गेल्या अनेक वर्षांपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. १९९० ते २००९ या काळात शिवसेनेचे दत्ताजी नलावडे येथील आमदार होते. २००९ मध्ये ही जागा काँग्रेसच्या सचिन अहीर यांनी जिंकली. तर २०१४ मध्ये ही जागा पुन्हा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी वरळीत भगवा फडकवला. तर २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी तब्बल ८९,२४८ मतांसह मोठा विजय मिळवला. येथे राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांना केवळ २१ हजार मतं मिळाली होती.