लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : खटुआ समितीच्या शिफारशींचे कारण देत मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा संघटना पुन्हा एकदा भाडेवाढीसाठी दबाव टाकत आहेत. सध्याचे किमान टॅक्सी भाडे २८ रुपये आणि रिक्षा भाडे २३ रुपये असून हे भाडे कमी असल्याचे सांगत आता यात अनुक्रमे ४ रुपये आणि २ रुपये प्रतिकिमीने भाडेवाढ करण्याचे संघटनांनी ठरवले आहे.

Mumbai, MHADA, Extends Deadline, E Auction, 17 Plots, Mumbai MHADA, mumbai news, mhada news, marathi news, e auction in mumbai,
मुंबईतील १७ भूखंडांच्या ई-लिलावाच्या निविदेला मुदतवाढ ? एक – दोन दिवसात निर्णय
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई

करोनाकाळात झालेले नुकसान भरून निघाले नाही. तसेच रिक्षा-टॅक्सी यांची देखभाल-दुरुस्तीचा खर्च अवाच्या सवा वाढला आहे. यासह इंधन दराच्या किमत काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे खटुआ समितीच्या शिफारशीच्या आधारे ही भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव संघटनेकडून परिवहन विभागाला पाठवण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०२२ रोजी रिक्षाच्या दरात २१ रुपयांवरून २३ रुपये केले. तर, टॅक्सीच्या दरात २५ रुपयांवरून २८ रुपये केले होते.

आणखी वाचा-धर्मादाय आयुक्तालतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांतून तूर्त सुटका

टॅक्सीचे ४, तर रिक्षाचे २ रुपये करण्याची मागणी

सोमवारी परिवहन आयुक्तांची भेट घेऊन टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ करण्याचे पत्र लिहिणार आहोत. सध्या टॅक्सी भाडे २८ रुपये असून ते ३२ रुपये आणि रिक्षा भाडे २३ रुपये असून २५ रुपये करण्याचे ठरवले आहे. -ए. एल. क्वाड्रोस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन