मुंबई : गेले काही दिवस तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या तापमानाचा पारा घसरला असला, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उकाडा कायम आहे. दरम्यान, पुढील चार – पाच दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार नाही. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लगाणार आहे.

हेही वाचा >>> परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन

mangroves survey in mumbai
खारफुटीचे नव्याने सर्वेक्षण; महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर सर्वेक्षण करणार
The discussion that the constitution will be changed again after the BJP raised slogans in the Lok Sabha elections has spread unrest among the Dalit community
दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा
Vinod Tawde reply that opponents are spreading propaganda about
भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

तापमानात घट झाल्यामुळे मुंबईत उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे तापमानात घट झाल्यानंतरही उष्मा जाणवत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३२.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रावरील तापमान सोमवारच्या तुलनेत १ अंशाने कमी नोंदले गेले. मुंबई तसेच उपनगरांत पुढील चार – पाच दिवस कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान असेल. मात्र हवेतील उष्मा कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.