मुंबई: राज्यातील जनतेच्या विश्वासाला अपात्र ठरलेल्या या सरकारच्या आशीर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. शेतकऱ्यांची या सरकारने घोर फसवणूक केली असून, विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय केला आहे. महायुती सरकारच्या काळात सामाजिक तेढ वाढली असून सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी करत, सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला.

या सरकारच्या काळात राजकारणातील गुन्हेगारी वाढली आहे. गोळीबाराच्या घटनांत वाढ झाली असून पोलीस ठाण्यात सत्ताधारी भाजपचे आमदार गोळीबार करू लागले आहेत. प्रक्षोभक विधान करून काही लोकप्रतिनिधी राजकीय वातवरण गढूळ करीत आहेत अशी टीका विरोधकांनी केली. गुंडांना पोसण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकार करीत आहे. अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टीका केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी नेत्यांच्या बैठकीला वडेट्टीवार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख, शिवसेनेचे सुनील प्रभू, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील, आमदार भाई जगताप आदी उपस्थित होते.

Partnership between billboard owners and officials in advertisement MNS allegation
जाहीरात फलक मालक आणि अधिकाऱ्यांमध्ये भागीदारी, मनसेच्या आरोपामुळे खळबळ
mahayuti stop loan sanctioned by centre to two sugar factories for not support in elections
विरोधकांच्या साखर कारखान्यांची कर्जकोंडी; लोकसभा निकालानंतर राज्य सरकारचा कडू डोस
Cases have been registered against the banks which deprived the farmers of crop loans by demanding CIBIL and other documents
पीक कर्जाबाबतचे आदेश व्यापारी बँकांनी धुडकावले; अडवणुकीने विदर्भातील शेतकरी सावकारांच्या दारात
‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
‘योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार नको!’ लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Opposition politics in the name of Naxalites Government movements
लेख: नक्षलींच्या नावावर विरोधाचं राजकारण…
opposition boycotted meeting organized by eknath shinde
कायदेशीर मत आजमावल्यावरच ‘सगेसोयरे’वर अंतिम अधिसूचना ; विरोधकांचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार
Kunbi certificate to Marathas with historical context Governments decision to divide Maratha society
ऐतिहासिक संदर्भ असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र : सरकारच्या निर्णयाने मराठा समाजात दुही
Thane Citizens, Thane Citizens Protest Aggressive Bike Towing, Police Seek Rule Adherence, thane news,
टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन, जागोजागी जनजागृती

हेही वाचा >>>जर्मनीला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य सरकारचा सामंजस्य करार

शेतकऱ्यांची फसवणूक

शेतकऱ्यांची घोर फसवणूक सुरू आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याची माहिती राज्यातील राज्यकर्त्यांकडून दिली जाते. पण केंद्राने बंदी कायम असल्याचे जाहीर केले. यात कांदा उत्पादक शेतकरी भरडले गेले. सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

विरोधक गोंधळलेले’

चहापानावर बहिष्कार टाकण्याची विरोधकांची परंपरा कायम असून ते निराश व गोंधळलेले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. केंद्र व राज्य सरकार चांगल्या प्रकारे जनतेसाठी निर्णय घेत असून विकासकामे होत आहेत, ही विरोधकांची खरी पोटदुखी असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. विरोधकांना जनतेच्या प्रश्नांशी देणेघेणे नसून राजकारण करायचे आहे. दुष्काळ, वादळ, अतिवृष्टी अशा विविध संकटांचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने गेल्या दीड वर्षात सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारही प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देत असून एक रुपयात पीकविमा योजना सुरू आहे. त्याचा हप्ता सरकार भरीत आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.