मुंबई: दुकानदाराच्या हत्ये प्रकरणी दिल्लीत दोघांची धरपकड

आर्थिक वादातून दोघांनी एका दुकानदारांची हत्या केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याबाबत गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दिल्ली येथून दोघांना ताब्यात घेतले आहे.

murder case
प्रतिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता

आर्थिक वादातून दोघांनी एका दुकानदारांची हत्या केल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याबाबत गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दिल्ली येथून दोघांना ताब्यात घेतले आहे.चेंबूरमधील आचार्य महाविद्यालयासमोर सुभाष गुप्ता यांचे शिव पेपर मार्ट दुकान आहे. सुभाष गुप्ता १९ मार्च रोजी दुकानात होते. रात्री नऊच्या सुमारास दोघेजण त्यांच्या दुकानात आले. या दोघांनी सुभाष गुप्ता आणि त्यांचा मुलगा विष्णू गुप्ता यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघाना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>>मुंबई: मालवणी झोपडपट्टीचा धारावीच्या धर्तीवर पुनर्विकास! प्रकल्प सध्या प्राथमिक स्तरावर

मात्र गुरुवारी सकाळी सुभाष गुप्ता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोवंडी पोलिसांनी याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सुभाष गुप्ता यांची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपीना पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आर्थिक वादातून सुभाष गुप्ता यंची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 16:39 IST
Next Story
“उद्धवजी, अजूनही काही बिघडलेलं नाही, पुन्हा एकदा…”, विधानपरिषदेत सुधीर मुनगंटीवारांची टोलेबाजी; सभागृहात पिकला हशा!
Exit mobile version