वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचा लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर कडवी टीका केली. नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्त होऊन कोंबड्या विकण्याचा धंदा करावा, असा सल्ला विनायक राऊत यांनी दिला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गद्दारांची जागा उकिरड्यावरच असते. बेईमानी, गद्दारी भविष्यात चालणार नाही, हे या निकालाने सिद्ध केले. राणे आणि विचार यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यांच्या मुलांकडेही कोणता विचार नाही. शिवसेनाप्रमुखांमुळे नारायण राणे मोठे झाले. मात्र, त्यांनी त्यांच्याशीच गद्दारी केली. त्यांनी आता राजकारणातून निवृत्त होऊन कोंबड्या विकण्याचा धंदा करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut criticized narayan rane
First published on: 15-04-2015 at 12:29 IST