वर्धा : इयत्ता अकरावीसाठी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आज निवड यादी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यास त्याच्या प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असेल त्यांना तिथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केल्या जाईल. त्या फेरीनंतरच त्यांचा विचार केल्या जाणार आहे.

हेही वाचा – ‘समाजकल्याणचे सचिव, मंत्री, न्यायालय, पोलीस सारेच भ्रष्ट’, प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची खळबळजनक ध्वनिफीत व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमनुसार त्यांच्या दहावीतील गुणांच्या आधारे कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड केली जाणार आहे. पुणे, पिपरी चिचवड, मुंबई, नागपूर, अमरावती व नाशिक या शहरात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविल्या जात आहे. आज ऑनलाईन निवड यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये त्यांना मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती मिळेल. त्या माहितीची प्रिंट आऊट घेवून संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार.