नागपूर : नागपूरमधील रेल्वे स्थानक मार्गावरील गणेश टेकडी उड्डाणपूल पाडकाम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. पुलाचा शेवटचा ४७ वा खांब तोडण्यात आला. आत्तापर्यंतच्या पुलाच्या पाडकामातून २२ हजार मेट्रिक टन मलबा निघाला असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे.

हेही वाचा – रविकांत तुपकरांनी शिस्त पालन समितीसमोर जाण्याचे टाळले, राजू शेट्टींना पत्राद्वारे कळविल्या व्यथा

हेही वाचा – गडचिरोली जवानांकडून नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उड्डाणपुलाच्या जागेवर सहापदरी रस्ता बांधणीचे नियोजन आहे. महामेट्रोने कंत्राटदार कंपनीला पूल तोडण्याचे काम दिले होते. त्यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. परंतु निर्धारित वेळेत काम पूर्ण झाले नाही. पाडकामातून निघालेला मलबा एका गो-शाळेने परिसर समतल करण्यासाठी घेतला आहे.