अकोला : देशात संविधान निर्मितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. भारतीय बौद्ध महासभा आणि ॲड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून हा विशेष कार्यक्रम रविवारी घेण्यात आला.

शहरातील तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणावर आयोजित कार्यक्रमात ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा.अंजली आंबेडकर, बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जी.वानखडे, प्रमोद देंडवे, ज्ञानेश्वर सुलताने, नीलेश देव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक, गणराज्य घडविण्यासाठी देशाच्या संविधानाचे उद्देशिका ही महत्त्वाची आहे. त्यांचा प्रत्येकाने अंगीकार केला पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. प्रा. अंजली आंबेडकर यांनी देशाच्या संविधानचा अमृत महोत्सवाचा विसर अनेकांना पडल्याची खंत व्यक्त केली. संविधानचे रक्षण ही काळाची गरज आहे. भारतीयांच्या हक्कांचे रक्षण होण्यास मोलाची मदत लाभेल, असे प्रा. अंजली आंबेडकर म्हणाल्या.

Success story of kalpana saroj who got married at 12 now owning crores business
बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
LIC special plan for women print eco news
‘एलआयसी’ची महिलांसाठी विशेष योजना; मिळणार ७ हजार रुपये महिना मानधन
mhada Konkan Mandals lottery of 2264 houses
म्हाडा कोकण मंडळ सोडत २२६४ घरांसाठी १७ हजार अर्ज, अर्जविक्रीसाठी काही तास शिल्लक सोमवारी रात्री अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात येणार
Shramik Mukti Sanghatna, Women property registration,
मालमत्तांच्या नोंदीमध्ये महिला उपेक्षितच, श्रमिक मुक्ती संघटनेकडून महिलांच्या नावाची दखल घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Remarried widows also have inheritance rights
पुनर्विवाहित विधवेसही वारसाहक्क!

हेही वाचा…अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी

२६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताकला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भारतीय संविधानाचे महत्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तीन हजार महिलांच्या उपस्थितीत ७५ हजार वेळा संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी देव यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

हेही वाचा…वर्धा : गांधींच्या जिल्ह्यातून गोडसे विचार हद्दपार करा, माजी पालकमंत्री सुनिल केदार म्हणतात, “महात्म्यांचा तिरस्कार…”

महिलांनी साकारला तिरंगा

विशेष कार्यक्रमात केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या या तिरंगी रंगाच्या साड्यांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अतिशय शिस्तबद्धपणे महिलांनी रांगेत बसून तिरंगा साकारला होता.

Story img Loader