बुलढाणा : सलग तिन दिवसांच्या गारठ्यानंतर आज, शुक्रवारी शहरासह जिल्ह्यातील थंडीचा कडाका कमी झाल्याने लाखो नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र ग्रामीण भागात धुके मुक्कामीच असल्याने बळीराजाची चिंता कायम आहे. मागील चार-पाच दिवसांपासून  ग्रामीण भागात धुक्याचे साम्राज्य पसरले आहे.

हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदे या पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळी व संध्याकाळी पिकांजवळ कुट्टी व पालापाचोळा जाळून पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. वातावरणातील गारठा कमी झाला असला तरी, धुक्याचा मुक्काम कायम आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी २४ तास सुरू राहणार नियंत्रण कक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज, शुक्रवारी तापमान सुसह्य झाल्याने लाखो जिल्हावासीयांनी सुटकेचा श्वास घेतला. बुलढाणा परिसरात आज १५ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची  नोंद झाली. कमाल तापमान २०.२ अंशावर आहे. मागील तीन दिवसांपासून बुलढाणा परिसराचे किमान तापमान १३ अंशाच्या आसपास रेंगाळले. गुरुवारी तापमानाचा पारा १३.४ तर बुधवारी १३.३ अंशापर्यंत घसरला होता.