लोकसत्ता टीम

नागपूर : अभिनेते सलमान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा तपास पोलीस करीत आहेत. त्याची माहिती मिळाली की दिली जाईल. मात्र या घटनेवरुन कायदा – सुव्यवस्था बिघडली असा अर्थ काढणे, चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
Nitin Gadkari Inauguration ceremony of development works held at Karvenagar Attendance of BJP workers is low
गर्दी जमविण्यासाठी भाजप ‘दक्ष’; गडकरींच्या सभेला अल्प उपस्थितीनंतर पदाधिकाऱ्यांना जाग
MP Rahul Shewale defamation case Uddhav Thackeray Sanjay Raut defamation case
खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर मानहानीचा खटला चालवणार
atishi takes charge as delhi cm with empty chair
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेवून स्वीकरला पदभार; कारण सांगत म्हणाल्या…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली

दीक्षाभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाअभिवादन केल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबद्दल फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, “झालेल्या हल्ल्याचा पोलीस तपास करीत आहे. या घटनेवरून विरोधकांकडून ज्या प्रकारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीका केली जात आहे, ती योग्य नाही.”

आणखी वाचा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र

मोदींच्या ‘ चारशे पार ‘ या घोषणेतूनच संविधान बदलाचे षडयंत्र रचले जात असल्याचा वास यैतो, अशी टीका राष्ट्रवादीचे ( शरद पवार) जयंत पाटील यांनी केली होती, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे नैराश्यात गेलेले आहे त्यामुळे ते काहीही बोलतात. ते मनावर घेऊ नका, सेंट्रल हॉलमध्ये संविधान ठेवूनच सगळ्या पक्षांचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे फडणवीस म्हणाले.

संविधान बदलणार असे काही विरोधकांकडून बोलले जात आहे त्यात काही अर्थ नसून उलट काँग्रेसकडून संविधान बदलवण्यात आले आहे असेही फडणवीस म्हणाले.