लोकसत्ता टीम

वर्धा : गेल्या दोन दिवसात झालेला व आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने निवडणुकीचा प्राचार गार पडला आहे. त्यातच अनेक ठिकाणी गार पडल्याने प्रचार साहित्याचे नुकसान झाल्याचे ऐकायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात कडक उन्हान घामाने चिंब झालेले उमेदवार आता पावसात भिजत आहे. आज तर सकाळपासून पावसाची रिपरिप सूरू झाली. उमेदवार गाडीने निघत असला तरी कार्यकर्ते वेळेवर पोहचत नाही. घरातून निघणे शक्य नसल्याचे उत्तर मिळत असल्याने उमेदवाराचा खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळते.

four in critical condition one dead due to poisoning pesticide
बुलढाणा : फवारणीतून विषबाधा! चोघे अत्यावस्थ, एकाचा मृत्यू
Thane, garbage crisis, waste collection, water scarcity, monsoon, disease spread, landfill space, solid waste planning, waste transport, Daighar project, Ghodbunder, municipal corporation, public representatives, epidemic diseases, dengue, malaria, traffic congestion, solid waste plant, alternative site
ठाणे : ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे कचरा समस्या, वाहनांसह प्रकल्प बंद पडण्याबरोबरच कोंडीमुळे नियोजन बिघडल्याचा प्रशासनाचा दावा
Committee, Flamingo, Habitat,
फ्लेमिंगो अधिवास, कांदळवन संरक्षणासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल देण्याचे आदेश
sangli sherinala latest marathi news
सांगली: कृष्णा नदी प्रदुषित करणाऱ्या शेरीनाल्याचे पाणी शेतीसाठी देणार – आयुक्त गुप्ता
8 Zika patients found in maharashtra in two months
राज्यात दोन महिन्यांत सापडले झिकाचे आठ रुग्ण; वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
bengal public flogging
‘जे झालं ते चांगलंच झालं’, विवाहबाह्य संबंधामुळे भररस्त्यात मारहाण झालेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया
Solid waste management department issues notices to eleven developers in Dombivli for avoiding mosquito breeding measures
डास निर्मिती प्रतिबंधक उपाययोजनांची टाळाटाळ, डोंबिवलीतील अकरा विकासकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नोटिसा
ash of khaparkheda thermal power plants found in kanhan river
खापरखेडा वीज केंद्राची राख कन्हान नदीत.. दूषित पाण्यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात..

रस्ते नसलेल्या भागात प्रचार साहित्य नेणाऱ्या गाड्या जागेवरच आहे. रात्री एकाच गाडी गेली. आता गाड्या उभ्याचअसल्याचे उत्तर एका प्रचार प्रमुखाने दिले. काल धोडी सवंत मिळताच भाजपचे रामदास तडस यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देऊन शेतीची पाहणी केली. ही संधी त्यांनी साधलीच. मात्र आता पदयात्रा घेण्यावर पावसामुळे बंधन आल्याने शहरी भागात एखाद्या घरीच बसून चर्चा करण्याचा पर्याय निवडल्याचे ते सांगतात.

आणखी वाचा-यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी

अमर काळे याची शहरात रॅली नियोजन करणारे प्रवीण हिवरे सांगतात की पावसामुळे अडचण झाली आहे. लोकं येत नाही. पॉम्पलेट भिजतात. बँड वाजत नाही. चिन्ह असलेल्या तुतारीत पाणी शिरले की ती वाजत नाही. म्हणून पदयात्रा ऐवजी आज अन्य पर्याय शोधावे लागतील. पाऊस थांबण्याची वाट पाहणे आलेच. ग्रामीण भागात तर गार पडल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे बोल ऐकून घेण्याची आपत्ती आहे. मत कसे मागणार, ही समस्या निर्माण झाली आहे. गावातील मंडप भिजले असून गार पडल्याने फाटले पण आहे.