चंद्रपूर : दूषित पाण्यामुळे राजुरा तालुक्यातील देवाडा व परिसरातील गावात ‘गॅस्ट्रो’चा उद्रेक झाला आहे. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील ३ रुग्णांचा व एकाचा घरी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देवाडा येथे भेट देवून जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे लोकांचे मृत्यू झाल्याचा थेट आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुषित पाण्यामुळे देवाडा येथे रुग्णांची प्रकृती ढासळत असल्याचे माहिती असतानाही ग्रामसेवकाने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने या गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जर लोकांना वेळीच शुध्द पाणी पुरविल्या गेले असते तर या गावात ४ रुग्णांवर मृत्यू ओढवला नसता. रुग्णालयात ४ रुग्ण दगावले व १ रुग्ण घरी दगावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णाची नोंद नसली तरी अजूनही गावातली परिस्थिती भयावह असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gastro outbreak at devada primary health center in rajura taluka amy
First published on: 06-08-2022 at 13:36 IST