नागपूर: भारत- पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधीनंतर सोमवारी (१२ मे २०२५ रोजी) सोन्याच्या दरात सकाळी प्रथम दरात घसरण झाली. त्यानंतर दुपारी आणखी दर घसून निच्चांकीवर गेले. अक्षय तृतीयानंतर सोन्याचे दर चांगलेच वाढले असतांना दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जम्मू कश्मिरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर ड्रोनद्वारे हल्ले केले गेले. तर भारतीय सैन्याकडूनही त्याला सडेतोड उत्तर दिले गेले. त्यामुळे दोन्ही देशाच्या सिमेवर तणावजन्य स्थिती होती. हा तणाव शस्त्रसंधीनंतर निवळत असल्याचे चिन्ह असतांनाच आता सोन्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
नागपुरातील सराफा बाजारात १० मे २०२५ रोजी दुपारी २ वाजता सोन्याचे दर मेकिंग आणि जीएसटी शुल्क वगळून प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९६ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७५ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर शस्त्रसंधीनंतर सोमवारी सकाळी १० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९४ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार ६०० रुपये नोंदवले गेले.
त्यानंतर दुपारी १ वाजता हे दर आणखी घसरून २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९३ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६० हजार ८०० रुपये होते. त्यामुळे नागपुरात सोन्याचे दर १० मे २०२५ रोजीच्या तुलनेत १२ मे २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ३ हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ३ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी २ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी २ हजार १०० रुपये घसरल्याचे दिसत आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण…
नागपुरातील सराफा बाजारात चांदीचे दर १० मे २०२५ रोजी सकाळी ९६ हजार ९०० रुपये प्रति किलो होते. हे दर सोमवारी (१२ मे २०२५) दुपारी १ वाजता ९४ हजार ५०० रुपरे प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात १० मे २०२५ रोजीच्या तुलनेत सोमवारी चांदीचे दर तब्बल २ हजार ४०० रुपयांनी घसरलेले दिसत आहे.