नागपूर : भारतात पर्यावरण, वन, वन्यजीव आणि किनारी क्षेत्र नियमन मंजुऱ्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत २१ पटीने वाढली आहे. देशावर पर्यावरण विनाशाचे संकट ओढवले असताना मंजुरीच्या वाढलेल्या वेगाबद्दल पर्यावरणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २०१८ मध्ये ५७७ प्रकल्पांना विविध मंजुऱ्या देण्यात आल्या होत्या, तर सन २०२२ मध्ये मंजुरीचे हे प्रमाण वाढून १२ हजार ४९६ पर्यंत पोहोचले, असे आकडेवारीवरून स्पष्ट होते. याबाबत संवर्धन कृती संस्थेचे पर्यावरण अभ्यासक देबी गोएंका म्हणाले की हवामान बदलामुळे भारत आणि उर्वरित जगासमोर संकट असूनही, आपले पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय सर्व प्रकल्पांच्या जलद मंजुरीसाठी आग्रही आहे, हे दुर्दैवी आहे. आपण आपली जंगले, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जमिनींसारख्या नैसर्गिक पायाभूत संपत्तीचा नाश करून त्या जागी रस्ते आणि रेल्वे मार्ग बांधणे हे विनाशकारी आहे, अशी प्रतिक्रिया गोएंका यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green clearance 21 times faster to grant environmental clearances for projects zws
First published on: 08-04-2023 at 05:37 IST