वर्धा : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रिया एक सप्टेंबरपासून सुरू झाली असून, गत दहा दिवसांत केवळ एक लाख पात्र उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीसाठी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवार पात्र असल्याची माहिती आहे.

१५ सप्टेंबरपर्यंतच नोंदणी मुदत आहे. राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे भरती केल्या जाणार आहे. मात्र प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे. अद्याप दीड लाखावर उमेदवार नोंदणी बाहेर आहेत. पण त्यापैकी ५० ते ६० हजारच नोंदणी करू शकतात. कारण अनेकांना खूप कमी गुण आहेत. ते इकडे फिरकणार नाहीत.

हेही वाचा – नागपूर : ‘घेऊन येतो आहे साहेबांचा संदेश’, काय आहे उपक्रम वाचा…

हेही वाचा – नागपूर: खाद्य तेलाच्या कारखान्यावर पोलिसांचा ‘नाट्यपूर्ण’ छापा, के आहे प्रकरण जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पात्रता परीक्षेत जवळपास नऊ हजारांना प्रतिबंधित करण्यात आले आहे. ही पदे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय तर खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अश्या दोन्ही प्रकारे भरल्या जाणार आहेत. आता नोंदणीसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत.