नागपूर : नागपूर महापालिका निवडणूक लवकरच होण्याचे संकेत आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेससह इतरही लहान- मोठे सगळेच पक्ष पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे. दरम्यान नागपूर निवडणूकीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारच्या मुलाखतीत भाष्य केले. गडकरींनी नागपूर महापालिका निवडणूकीत मागच्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा किती जागा मिळणार? याबाबतही अंदाज वर्तवला.

भा. ज. प. महानगरतर्फे नागपुरातील सुरेश भट सभागृहात डॉ. उदय निरगुळकर यांनी नितीन गडकरी यांची मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील कामाबाबत प्रकट मुलाखत घेतली. याप्रसंगी डॉ. निरगुळकरांनी गडकरी यांना येत्या नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? याबाबत प्रश्न विचारला. त्यावर गडकरी म्हणाले, मागच्या निवडणूकीत भाजपला १०८ जागा मिळाल्या होत्या. परंतु त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. त्यामुळे पाच वर्षांत शहरात पाणि, वीजसह इतर समस्यांबाबत मोर्चेही निघाले नाही. त्यातून नागरिक आनंदीत असल्याचे दिसून यंदा मागच्या महापालिका निवडणूकीहूनही जास्त जागा मिळण्याचा अंदाजही नितीन गडकरी यांनी वर्तवला.

विरोधक भाजपमध्ये मोर्चे कोण काढणार?

ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुळकर यांनी मुलाखतीत नितीन गडकरी यांना सगळेच महत्वाचे विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरात मोर्चे कोण काढणार? हा प्रश्न विचारला. त्यावर नितीन गडकरी म्हणाले, सुंदर मुलीवर १०० मुले प्रेम करतात. त्याप्रमाने भाजपवर मोठ्या संख्येने नागरिक प्रेम करत आहे. त्यामुळे भाजपमध्ये चांगले लोक मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहे.

येत्या काळात पथकराबाबत तक्रार राहणार नाही

अधून- मधीन पथकराच्या (टोल टॅक्स) शुल्काला नागरिक कंटाळल्याचे कानावर येत होते. त्यामुळे आता ३ हजार रुपयांत वर्षभर २०० पथकरातून प्रवास करता येणार असल्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा पैसा वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांची पथकराबाबतची नाराजी दूर होणार आहे. परंतु आपल्याला चांगले रस्ते व सेवा पाहिले असल्यास ते चांगले ठेवण्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे पथकर आवश्यक असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीकांत जिचकार यांची ऑफर नकारली

पूर्वीच्या काळात भाजप उमेदवारांची अमानत रक्कम जप्त होत होती. भाजप उमेदवारासाठी मत मागायला गेल्यास लोक दगड मारत होते. या काळात काँग्रेस नेते श्रीकांत जिचकार यांनी मला तु कामाचा व चांगला व्यक्ती आहेत. परंतु चुकीच्या पक्षात आहे. तु काँग्रेसमध्ये आल्यास चांगले राहिल, असे सांगितले होते. परंतु मी मेलो तर चालेल, परंतु भाजप सोडणार नसल्याचा निर्णय घेतला. इतरही कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतल्याने आज भाजपला चांगले दिवस आल्याचेही गडकरी म्हणाले.