नागपूर : नागपूर येथील विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी समोर आल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेवून तत्कालीन केंद्री नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना नागपूर विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सूचना केली होती. आता अमरावती विमानतळाचे नामकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

अमरावती विमानतळावरून १६ एप्रिलपासून मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. आता नामकरण करण्याची मागणी होत आहे. विदर्भाचे सुपुत्र तथा कृषी क्षेत्रामधील क्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव हे अमरावती विमानतळाला देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत आहे. नुकतेच या विमातळावरुन प्रवासी सेवा सुरु करण्यात आली  आहे. यामुळे ही मागणी पुन्हा समोर आली आहे. अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहून केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषी क्षेत्रामध्ये क्रांती निर्माण केल्यामुळे देशाचे पहिले कृषी मंत्री होणाचा मान हा डॉ. पंजाबराव देशमुख यांना मिळाला होता. त्याच्या याच योगदानामुळे विदर्भात कृषी विद्यापीठास त्याचे नाव देण्यात आले. अमरावती येथील विमानतळ तयार होत असतांनाच त्याला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी होत होती. परंतु विमानतळ तयार होवून येथे प्रवासी सेवा सुरु नसल्याने ही मागणी नंतर मागे पडली. परंतु आता प्रवासी विमान सेवा सुरु झाल्याने विमानतळाच्या नामकरनांचा मुद्दा ऐरणवीवर आला आहे. नागपूर येथील विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी समोर आल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी पुढकार घेवून तत्कालीन केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांना नागपूर विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सुचना केली होती असेही सलील देशमुख यावेळी म्हणाले. अमरावती विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव दिल्यास एका शेतकरी नेत्याचा तो खऱ्या अर्थांने त्यांचा सन्मान ठरेल. प्रवासी सेवेनंतर येथुन कृषीमालास विदेशात पाठविण्याची सेवा सुध्दा सुरु केल्यास अमवराती व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होईल. या दुष्टीकोणातुन सुध्दा विचार व्हावा अशी मागणी सलील देशमुख यांनी पत्रातून केली आहे.