नागपूर : शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात वृद्धांसाठी राज्यात एका योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेचा मनोहर जोशी यांना आनंद व दु:ख दोन्ही होते. या योजनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानी भाष्य केले.

हेही वाचा – मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास फडणवीस का गेले नाहीत? जाणून घ्या…

हेही वाचा – काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाने उगाच कोल्हेकुई…; चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात ज्येष्ठ नागरिकांसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी यांनी राज्यात वृद्धाश्रमाची योजना आणली. वृद्धाश्रमाच्या योजनेमुळे वृद्धांना आधार मिळणार असल्याने त्यांना या योजनेचा आनंद होता. परंतु आपल्या सुसंस्कृत राज्यात वृद्धांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महाराष्ट्रात वृद्धाश्रम काढण्याची सरकारवर पाळी आल्याचे जोशी यांना दु:ख होते. त्यामुळे प्रत्येकाने आपले आई-वडील आणि वृद्धांना चांगली वागणूक द्यायला, हवी असेही गडकरी म्हणाले.