केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असूनही पक्षाच्या सभेला पन्नास टक्के लोकप्रतिनिधी व पदाधिकारी गैरहजर राहण्याचा प्रकार ज्येष्ठ नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. दांडी मारणाऱ्या अशा नेत्यांना लेखी जाब विचारल्या जाणार आहे.

हेही वाचा- “सकाळच्या शपथविधी’वर योग्यवेळी पुन्हा बोलेल”; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सूचक इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवारी पुलगावला संपन्न झाली. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, दादाराव केचे व संघटन सचिव उपेंद्र कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा व तालुका पदाधिकारी, आता माजी झालेल्या जि. प. व न. प. सदस्यांसह एकूण साडेचारशे नेत्यांना निमंत्रण देण्यात आले. मात्र अवघे शंभरच हजर झाले. पक्षाच्या सभेला गंभीरपणे न घेणाऱ्या या जिल्हा नेत्यांचे कान उपटण्यात आले. पक्ष यांना तिकीट देतो, निवडून आणतो. त्यांची ताकद वाढते. मात्र पक्षालाच हे वाऱ्यावर सोडतात, अशी भावना भाषणातून व्यक्त झाली. अशांना स्पष्टीकरण मागितले पाहिजे, असे मत कोठेकर यांनी व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट या संदर्भात बोलताना म्हणाले की, लक्षणीय गैरहजेरी ही चिंतेची बाब आहे. वेगवेगळी कारणे राहू शकतात. मात्र त्यांना स्पष्टीकरण मागण्याचे ठरले आहे.