नागपूर : शेतकऱ्याच्या प्रश्नावरुन विरोधकांनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसाचे हित पाहत असताना संकटकाळात विविध योजना जाहीर करत त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे, मात्र विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्यामुळे ते आता कांद्यावर राजकारण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलत होते. कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यामुळे उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काद्याची निर्यात बंदी हटविण्याची मागणी केंद्र सरकारकडे वारंवार करत होतो त्यामुळे केंद्र सरकारने ती मान्य केली आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असून विरोधक मात्र शेतकऱ्यासाठी काही न करता त्यांच्या नावावर केवळ राजकारण करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
sharad pawar ajit pawar marathi news
“माझे बंधू आजारी असताना शेवटच्या काळात…”, शरद पवारांची अजित पवारांवर थेट टीका: म्हणाले…
What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, “बारामतीत जिंकणार तर…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Modi Said About Uddhav Thackeray ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”
Devendra Fadnavis
‘भाजपासाठी महाराष्ट्र अवघड?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आव्हान आहेच…”

हेही वाचा – नागपूर : सुरक्षारक्षकाकडून रायफल लोड करताना गोळी सुटली, एटीएमची काच फुटली

हेही वाचा – गोंदियात रासायनिक पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही

मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी, आम्ही तिघेजण केंद्र सरकारच्या पाठीमागे यासाठी लागून होतो. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब आम्ही केंद्र सरकारला कळवली होती. त्याला आता प्रतिसाद मिळाला. देशात कांद्याची कमतरता झाली तर बाहेरच्या देशातून आयात करावा लागतो. मात्र आता निर्यात बंदी हटविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.