चंद्रपूर : फेब्रुवारी महिना संपण्यास आणखी आठवडाभराचा अवधी असला तरी चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा तीव्र पाणी टंचाईची झळ बसेल, असा इशारा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाने दिला आहे. १०८.४५ टक्के पाऊस झाला असला तरी नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार ४० मि.मी. आहे. २०२२-२३ यावर्षी जिल्ह्यात ११२० मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाची टक्केवारी १०८.४५ इतकी आहे. पर्जन्यमानात वाढ झाली असली तरी नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट झाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Soyabean crop in danger due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्यात
Chandrapur Sudhir mungantiwar marathi news
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”
MHADA, MHADA houses Thane district, MHADA houses,
ठाणे जिल्ह्यात म्हाडाला मिळणार सुमारे १४०० घरे ?
heavy rain Gondia district,
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
rain water enter in hospitals in gondia
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..
Due to ongoing rain in Gondia district since early morning administration warned of caution
भीषण! गोंदियात मुसळधार पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू

हेही वाचा – नागपूर : चोरी करण्यापूर्वीच चोरट्यांच्या हातात बेड्या, झाले असे की…

हेही वाचा – नागपूर : राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने उपराजधानीत गुटखा-तंबाखू तस्करी, वाडीत ५५ लाखांचा गुटखा जप्त

जिल्ह्यात १३४ निरीक्षण विहिरी आहेत. जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिन्यांत या निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली जाते. यात सप्टेंबर महिन्यातील पाण्याच्या पातळीची नोंद महत्त्वाची असते. या महिन्याच्या नोंदीनुसार, जिल्हा प्रशासनाकडून टंचाईचे आराखडे तयार केले जातात. सप्टेंबर महिन्यात पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. त्यात बल्लारपूर, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, मूल, सावली, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड आणि जिवती तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या तालुक्यांत पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.