नागपूर : राज्याच्या सर्वच भागातून आता पावसाने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे सूर्यनारायणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्याच्या अनेक भागात तापमान चाळीशीपार गेले आहे. तर विदर्भात तो ४३-४४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. शनिवार आणि रविवार त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.

बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या चटक्यांसोबत उकड्याचा देखील सामना करावा लागत आहे आणि ते आरोग्यासाठी जास्त धोकादायक आहे. उष्माघाताचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात जराही घट झालेली नाही, उलट त्यात वाढ होत आहे. त्यामुळे घामाच्या धारा आणखी वाढत आहेत.

ujani dam, rain, Pune district,
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पुढील महिनाभराच्या पावसावर उजनीचे भवितव्य
A History of Geography A Rainy Road to Prosperity
भूगोलाचा इतिहास: समृद्धीचा पर्जन्यमार्ग
Vidarbha, Konkan, Heavy rain,
विदर्भ, कोकणात दोन दिवस पावसाचा जोर कायम
Zika, Zika virus, Zika virus symptoms,
राज्यात १५ दिवसांत सापडले झिकाचे २० रुग्ण, ‘अशी’ घ्या काळजी
Gold prices fall between Rs 400 and Rs 600 per 10 grams
सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात  २४ तासांत घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…
Heavy rain, maharashtra, rain,
Maharashtra Weather Update : राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा
anger among citizens over power outage in amrutdham area of panchavati zws 70
अमृतधाम परिसर विजेच्या लपंडावामुळे त्रस्त – रोजच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये रोष
wardha, Tragic Turn incident, mama Succumbs to Nephew s Assault in Tilak Nagar wardha, mama Accused of Molesting Minor Niece in Hinganghat Taluka, crime news, hinganghat taluka, molest, pulgaon wardha
वर्धा : भाच्याची समजूत काढणे पडले महागात, एकाच ठोश्यात मामा…

हेही वाचा…वाशीम : कडक उन्हात पाण्यासाठी पायपीट; कोट्यवधी रुपयांचा कृती आराखडा मात्र उपाय योजना कधी ?

दरम्यान राज्यातील तापमानाचा पुढच्या तीन दिवसांचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ अपेक्षित आहे. किमान तापमान आताच २४-२५ अंश सेल्सिअसजवळ पोहचला आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार आहे. रुग्णालये देखील सज्ज आहेत.