यवतमाळ: गरीब निराधार लोक गल्लीबोळात कुठेतरी आसरा घेऊन वास्तव्य करतात. अशा लोकांना हक्काचे घर हवे आहे, मात्र या गरीब आणि वृद्धांना घर कोण देणार? घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या रसिकाश्रय संस्थेने निराश्रीत असलेल्या दोन महिलांना चक्क घर बांधून दिले.

सुनंदा सोनवणे आणि वच्छला पेटेवार यांना नुकताच हक्काचा निवारा मिळाला. सुनंदा शरीराने व्यंग असून विधवा आहे. सहा वर्षाआधी पतीने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यावेळेस मुलगा छोटा होता. कष्ट करून जगण्याची शक्ती तिच्यात नव्हती. सुनंदा एकटी पडली कुठल्याही नातेवाईकांनी तिला आधार दिला नाही. स्वतःच राहतं कच्च घर पडलं, मात्र ते बांधण्यासाठी तिच्याकडे पैसेही नव्हते. म्हणून ती स्वतःच घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन निरश्रीत म्हणून राहू लागली.

हेही वाचा… विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस तालुका घोषित, वाचा सविस्तर

एकदा महेश पवार यांच्या निराधार संघटनेच्या बैठकीला आली आणि राहायला घर नसल्याची व्यथा महेश पवार यांच्या समोर मांडली. क्षणाचाही विलंब न करता रसिकाश्रयची टीम कामाला लागली आणि तिचे घर उभे करून दिले. आज दोघे मायलेक आनंदाने त्या घरात वास्तव्य करत आहे.

वच्छला पेटेवार या ७६ वर्षांच्या वृद्ध महिला पडक्या झोपडीत राहत होत्या. मुलगा आहे पण तो सांभाळ करत नाही. म्हणून अतिक्रमणच्या जागेवर एक झोपडी बांधून गेल्या १० वर्षांपासून ती राहत आहे. कुणीतरी जेवायला देतो तेव्हा तिचे पोट भरते. पडकी झोपडी कधी अंगावर पडेल याचा नेम नाही. तिचेही घर रसिकाश्रयने उभे करून दिले.

हेही वाचा… अंधूक प्रकाशामुळे नागपूरऐवजी विमान वळविले मुंबईकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही घर उभे झाले आणि थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला. घाटंजीचे भरत तायडे, विठ्ठल बिजेवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. घराचे पूजन करून वच्‍छलाबाई आणि सुनंदा यांना पेढा भरवण्यात आला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी दिली.