नागपूर : राहुल गांधी यांचे लोकसभेतील कृत्य म्हणजे पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार निवडून यावे यासाठी केलेली मदत आहे. राहुल गांधी यांच्याकडून संसदेत अपमानजनक व्यवहार अपेक्षित नाही, खास करून अशी व्यक्ती ज्याची पंतप्रधान व्हायची इच्छा आहे, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मुनगंटीवार प्रसार माध्यमांशी नागपुरात बोलत होते. राहुल गांधी यांचे लोकसभेतील कृत्य हे जगासमोर देशाचा गौरव कमी करण्याचे काम करत असेल तर अशा कृतीला माफी नाही, जनता सुज्ञ आहे, त्यांना निवडणुकीत जागा दाखवेल, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
सरकार जाईल, मध्यावधी निवडणूक लागेल अशा अनेक वावड्या गेल्या अनेक दिवसांपासून उठत आहे, पण या वावड्या ‘मुंगेरीलाल के हसिन सपने’ पाहणारे आहे. आमचे सरकार आल्यापासून सरकार पडेल असे स्वप्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडत असतात, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
हेही वाचा – नागपूर : पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन तर प्रभारी अधिकाऱ्यांना सूट?
संजय राऊत आता राहुल गांधींचे भक्त झाले आहेत. मती भ्रष्ट झाल्यामुळे ते असे बोलतात. राहुल गांधींचे समर्थन करणे म्हणजे लोकशाहीला धोका आहे. हा फ्लाईंग किस हा देशाला दिला आहे, असे संजय राऊत यांचे म्हणणे चुकीचे आहे. देशासमोर काय आदर्श प्रस्थापित करत आहे असा प्रश्नही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.