महाराष्ट्रानेदेखील या धर्तीवर पाऊल उचलण्याची पर्यावरणवाद्यांची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्याला गेली काही वर्षे सलगपणे वातावरण बदलाच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूने नुकतेच हाती घेतलेल्या वातावरणीयदृष्ट्या सक्षमता अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रानेदेखील पाऊल उचलण्याची गरज असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हेच राज्याचे पर्यावरण व वातावरण बदल मंत्री आहेत. वातावरण बदल कृती आराखड्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शुक्रवारी ‘तामिळनाडू वातावरण बदल अभियाना’ची सुरुवात झाली. त्याअंतर्गत या विशिष्ट उद्देशासाठी ‘तामिळनाडू ग्रीन क्लायमेट कंपनी’ची (टिएनजीसीसी) स्थापना करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu is first state to launch climate change campaign in country rgc 76 zws
First published on: 10-12-2022 at 17:16 IST