नागपूर : एअर इंडिया कंपनीच्या अहमदाबाद – लंडन अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसताना वेगवेगळ्या ठिकाणाहून तांत्रिक बिघाड आणि इतर कारणामुळे विमान रद्द होण्याच्या घटना घडत आहेत. नागपूर विमानतळावर अशीच काहीशी विचित्र घटनेचा अनुभव काल प्रवाशांना आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी अचानक दाट धुक्याने झाकलेले आकाश आणि क्षीण झालेली दृश्यमानता यामुळे थरारक क्षण निर्माण झाले. इंडिगोच्या बंगळूरु – नागपूर आणि मुंबई – नागपूर या दोन विमानांनी धावपट्टीपर्यंत झेप घेतली होती, मात्र धावपट्टी स्पष्ट न दिसल्याने दोन्ही वैमानिकांना तातडीने ‘गो-अराउंड’ करण्याचा निर्णय घेतला. अचानक आकाशात पुन्हा झेपावलेल्या विमानांनी प्रवाशांच्या कमळजाचा ठोका चुक्याला काही क्षणासाठी विमानात सन्नाटा पसरला, अनेकांच्या मनात अनिष्ट कल्पना डोकावल्या काहींना नुकतीच झालेली अहमदाबाद दुर्घटना आठवली.
दोन्ही विमानांच्या लँडिंगला लब्बल २० से २५ मिनिटांचा उशीर झाला. अखेर, दोन्ही विमाने सुखरुपपणे धावपट्टीतर उतरली आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकत विमानतळाकर पाऊल ठेवले.
इंडिगो’चे ६ ए ५००३ हे बंगलुरु नागपूर विमान सकाळी ६:५० वाजता आणि ६ई-४३४२ मुंबई – नागपूर विमान सकाळी १०:२० वाजता नागपूर विमानतळावर उतरणार होते; परंतु कमी दृश्यमान्योमुळे वैमानिकांना विमान पुन्हा आकाशात न्यावे लागले. दोन्ही विमानांनी २० ते २५ मिनिटे आकाशात घिरट्या मारल्यानंतर धावपट्टीवर सुखरूप उत्तरले, या नैसर्गिक अश्यामुळे विमानातील प्रवाशांना काही काळ धक्का बसला. बंगलुरू – नागपुर विमान सकाळी ७:१० वाजता आणि मुंबई-नागपूर विमान सकाळी ७:५० वाजता
जवळपास २० ते २५ मिनिटे विमान हवेत घिरट्या घालत राहिले आणि शेवटी दोन्ही वैमानिकांच्या कुशलतेमुळे सुरखरूप विमान धावपट्टीवर उतरली प्रवाशांनी उतरल्यावर सुटकेचा निश्वास सोडला; पण भीतीचा अनुम त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवून गेला. ही घटना काहीशी अहमदाबाद विमान दुर्घटनेची आठवण करून देणारी होती.