नागपूर : छत्रपती शिवरायांचे कार्य चिरकाल टिकणारे असून ते आमच्यासाठी आदर्श असल्याचे मत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्या निमित्त महालमध्ये आयोजित कार्यक्रमात भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – नागपूर : धक्कादायक! चक्क कैदी आणि पोलिसाने केली पार्टी..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी विक्रमसिंह मोहिते उपस्थित होते. शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांसोबतच नागपुरातील ३० ढोलताशा पथकांनी एकत्रित वादन सादर करीत शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली. यावेळी तरुणाई पारंपारिक वेशभूषेत हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.