नाशिक: इयत्ता ११ वी लांबलेली प्रवेश प्रक्रिया अजूनही चालुच असून इयत्ता १० वीच्या पुनर्परीक्षार्थींना प्रवेश घेण्यासाठी विशेष फेरी शिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली असून गुरूवारपासून या फेरीला सुरुवात झाली आहे. ही फेरी २५ ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार आहे.

यंदा ११ वी प्रवेश प्रक्रियेत नऊ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांसाठी प्रवेश फेऱ्या होत असताना नुकताच इयत्ता १० वी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश घेता यावा तसेच आधी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी सतत विशेष फेरी घेण्यात येणार आहे. निवडलेल्या आणि प्रतीक्षाधीन विद्यार्थ्यांची यादी दररोज सकाळी १० वाजता घोषित केली जाणार आहे. यासाठी दररोज नव्याने अर्ज करावा लागेल.

BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
Indian Merchant Navy Seaman Recruitment 2024
सुवर्णसंधी! भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये मेगा भरती! मिळेल चांगला पगार, आज करा अर्ज

हेही वाचा… एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडून अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

संध्याकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ या वेळेत दैनंदिन गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतील. दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये विद्यार्थ्याने पसंती दर्शविलेल्या प्रत्येक विद्यालयाच्या प्रतीक्षा यादीमधील त्याचे स्थान विद्यार्थ्यांस पाहता येईल. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पाहता येतील. विद्यालयात रिक्त असलेल्या जागेप्रमाणे विद्यार्थी त्या विद्यालयाच्या निवड यादीत समाविष्ट होतील. अर्ज केलेले उर्वरित विद्यार्थी प्रतिक्षा यादीत जातील. दररोज पसंती, दररोज सुधारित गुणवत्ता यादी हे या फेरीचे वैशिष्ट्य आहे.

सतत फेरी अंतर्गत २० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज करता येईल. तसेत सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवेश घेता येणार आहे. सायंकाळी सहापर्यंत अतिरिक्त वेळ प्रवेशासाठी देण्यात आला आहे.