नाशिक : जिल्ह्यातील काही भागात तीन ते चार दिवसांपासून दमदार पाऊस होत असताना सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर होत आहे. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात स्थलांतरीत पक्ष्यांच्या आगमनास सुरूवात झाली असून पुढील काही दिवसांत नव्या पक्ष्यांची अधिक भर पडेल, असे पक्षीतज्ज्ञांचे मत आहे.

निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर परिसरात समाधानकारक पाऊस होत आहे. धरण परिसरात मुबलक स्वरूपात जलसाठा झाला आहे. थंडीची चाहूल लागल्यावर परदेशी पक्ष्यांचे अभयारण्यात येणे सुरु होते. यंदा मात्र वातावरणातील बदलामुळे पक्षी काही महिने आधीच अभयारण्यात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. स्थलांतरीत पक्षी रशिया, युरोपमधून प्रवास करत भारतात आल्यावर काही काळ विश्रांती घेतात. नंतर पुढील प्रवासासाठी अफ्रिकेकडे जातात.

Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Permanent ban on feeding chicken meat to tigers in Nagpur
नागपुरात वाघांच्या ‘मटण पार्टी’वर कायमची बंदी…‘एच-५एन-१’ विषाणूमुळे…
flamingos and over 50 migratory Birds arrive at Suryachiwadi Lake
साताऱ्यातील जलाशयात ‘परदेशी पाहुणे’ दाखल; रोहित, पट्टेरी राजहंससह ५० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
anis demand narendra dabholkar name to vigyan bhavan inauguration venue
सावरकरांनंतर आता नरेंद्र दाभोलकरांच्या नावासाठी आग्रह; उद्घाटनीय स्थळाला नाव देण्याची ‘अंनिस’ची मागणी
Astronomy , planets , solar system, Astronomy News,
नभोमंडपात ७ जानेवारीला सात घटनांचा अनोखा संगम
Eurasian griffon vulture, Successful treatment vulture,
… आणि दुर्मिळ गिधाडाने पुन्हा आकाशात झेप घेतली, युरेशियन ग्रिफॉन जातीच्या गिधाडावर यशस्वी उपचार
vulture released from tadoba andhari tiger reserve traveled 4000 kilometers reached tamil nadu
पाच राज्ये अन् चार हजार कि.मी.चा प्रवास; ताडोबातील गिधाड तामिळनाडूत

हेही वाचा : मधमाश्यांच्या हल्ल्यात वृध्दाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील घटना

यावर्षी कुठे भरपूर पाऊस तर, कुठे पाऊसच नाही, अशी स्थिती असल्याने याचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतर चक्रावरही होत आहे. त्यामुळेच यंदा ब्ल्यू चीक, बी इटर, सायबेरियन स्टोन चाट या पक्ष्यांचे काही महिने आधीच नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात आगमन झाले आहे. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात मुबलक स्वरूपात जैव विविधता आहे. पक्ष्यांना आवश्यक खाद्य असल्याने या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट कायम असतो. हा परिसर विदेशी पक्ष्यांनाही खुणावतो. पुढील महिन्यात पक्ष्यांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता असून यासंदर्भात वन विभागाने या पक्ष्यांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : भाजपचे नाशिक लोकसभेच्या जागेवर लक्ष, दिंडोरी मतदार संघापासून प्रदेशाध्यक्ष दूर

वन विभागाकडून नियोजन गरजेचे

‘वातावरणातील बदलाचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत काही दिवस आधीच पक्षी अभयारण्यात दाखल झाले. वनविभाग ही नोंद ठेवत असेल तर उत्तम. अभयारण्यात पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य आहे. या ठिकाणी असणारे पाणी वर्षभर राहिल असे नाही. या अनुषंगाने वनविभागाने नियोजन करणे आवश्यक आहे’, असे मत पक्षीतज्ज्ञ प्रा. आनंद बोरा यांनी व्यक्त केले.

Story img Loader