नाशिक – मारकडवाडीतील मतदानाबाबत शंका असतील तर, निवडणूक आयोगाने लोकांच्या म्हणण्यानुसार तपास करावा. गडबड झाली असल्यास चौकशी होणे आवश्यक आहे. एखाद्या यंत्रात बिघाड असू शकतो. परंतु, सर्व यंत्रांमध्ये बिघाड होता, असे म्हणणे योग्य नाही, अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे मांडली.

ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्या मारकडवाडीतील ग्रामस्थांशी रविवारी राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांनी संवाद साधला. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावरून आठवले यांनी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चौकशीची मागणी करतानाच विरोधकांनी पराभव मान्य केला पाहिजे, असा सल्ला दिला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या असता आम्ही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. विरोधकांनीही चांगली मते मिळाल्यावर मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केली नव्हती. विरोधकांनी चुकीचा पायंडा पाडू नये. आपली मते का कमी झाली, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आठवले यांनी मांडली.

maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Pune Traffic, Pune Encroachment , Muralidhar Mohol,
पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत

हेही वाचा : नाशिक : युवक मारहाणीच्या निषेधार्थ पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

राज्यातील महायुती सरकारमध्ये रिपाइंला विधान परिषदेची एक जागा, एक मंत्रिपद आणि दोन ते तीन महामंडळांवर स्थान देण्याची मागणी करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली. आपल्याशिवाय सरकार येणार नाही, या त्यांच्या स्वप्नांचा भंग झाला. त्यांना महायुतीत घेऊन काही फायदा होणार नाही. कडवी भूमिका घेत असल्याने महायुतीत मनसेची आवश्यकता नसल्याचा आठवले यांनी पुनरुच्चार केला.

Story img Loader