नाशिक – रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांना तडाखा दिला. शहर व ग्रामीण भागात झाडांची पडझड झाली. वादळात कुक्कुटपालन केंद्र, काही घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. मनमाडसह अनेक ठिकाणी कित्येक तास वीजपुरवठा खंडित झाला. झाडांवरील कैऱ्या, चाळीतील कांद्याचे नुकसान झाले. सुरगाण्यातील हतगड येथे रविवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंडपही वादळात कार्यक्रमाआधीच जमीनदोस्त झाला.

आठवडाभरापासून जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असून प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वातावरणात रविवारी बदल झाले. सकाळपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अकस्मात आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. द्वारका, वडाळा भागात झाड कोसळले. यात जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. गोदाकाठी उभारलेला मंडपही कोसळला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा अधिक जोर होता. हरसूलच्या दाणवेश्वर परिसरात दोन तास पाऊस झाला. शेतांमध्ये पाणी साचले. जनावरांची ऐरण पाण्यात गेली. वादळी वारा व पावसाने ग्रामीण भागात छप्पर दुरुस्ती करण्यात अडचणी येत आहेत. पावसाने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची तारांबळ उडवली. त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी रविवारी तुलनेत अधिक गर्दी असते. दर्शन रांगेत तीन, चार तास प्रतीक्षा करावी लागते. या भागात अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला.

Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

हेही वाचा – नाशिकसह खानदेशात वादळी वाऱ्याचा कहर; अनेक वृक्ष कोसळले, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट

दिंडोरी तालुक्यात वादळी वाऱ्याने कांद्याचे नुकसान झाले. बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठविलेला आहे. वादळात काही ठिकाणी पत्रे उडून गेल्याने पावसाने कांदे भिजले. मनमाड, येवला व नांदगाव भागात वेगळी स्थिती नव्हती. मालेगाव आणि बागलाण तालुक्यात पावसापेक्षा वादळी वाऱ्यामुळे अधिक नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव या भागात वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. धुळीमुळे वाहने चालविणे अवघड झाल्याने चालकांनी वाहने सुरक्षितस्थळी उभी केली. रामपुरा भागात कुक्कुटपालन केंद्राचे पत्रे उडून नुकसान झाले. भटू खैरनार यांचे कुक्कुटपालन केंद्र व घर वादळी पावसात जमीनदोस्त झाले. बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे, द्याने, नामपूर या भागातही वादळी वाऱ्याने थैमान घातले. मनमाड शहरात चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित होता. इतर भागात कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती होती.

हेही वाचा – नाशिक : संत निवृत्तीनाथ पालखीचे नाशिककरांकडून उत्स्फुर्त स्वागत; मनपाकडून स्वागतासाठी तीन लाखांचा निधी

अजित पवार यांचा कार्यक्रम होण्याआधीच मंडप जमीनदोस्त

सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रविवारी सायंकाळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उभारलेला मंडप सकाळी वादळी पावसात जमीनदोस्त झाला. दुर्गम आदिवासी भागात तातडीने नव्याने मंडप उभारणे अशक्य होते. त्यामुळे जमीनदोस्त झालेला मंडप काढून घेतला गेला. कार्यक्रमस्थळी केवळ व्यासपीठाची रचना ठेवली गेल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.