उरण : सध्या अनेक ठिकाणी माती, कचरा आणि राडारोडा टाकून खारफुटी (कांदळवन) मारली जात आहे. याकडे सिडको आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विकासकांच्या फायद्यासाठी अनेक ठिकाणच्या खारफुटीवर मातीचा, कचऱ्याचा भराव टाकून ती मारली किंवा नष्ट केली जात आहे.

खारफुटीवर ही संरक्षित आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी अतिशय महत्वाची आहे. या खारफुटीच्या संवर्धनासाठी अनेक उपाययोजना केंद्र आणि राज्य सरकारने आखल्या आहेत. याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासन, वन विभाग यांची आहे. तर दुसरीकडे राडारोडा आणि कचऱ्याच्या भरावामुळे प्रदूषण निर्माण होत आहे. याकडेही या विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Textile project of Reliance in Palghar
पालघरमध्ये रिलायन्सचा वस्त्रोद्याोग प्रकल्प; जमिनीच्या हस्तांतरासाठी एमआयडीसीचा अर्ज, दर मात्र गुलदस्त्यात
Koradi Power Generation Project, Koradi,
वीज निर्मिती प्रकल्पावरून सरकार व पर्यावरणवाद्यांमध्ये जुंपणार, ‘हे’ आहे कारण
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
Residents on the master list will have to pay a lower rate for more area MHADA Vice Presidents decision
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
on Kaas Plateau rush of tourists
कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी, वाहतूक कोंडी आणि यंत्रणेवर ताण

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ गणेश नाईकांच्या खांद्यावर? ठाण्याच्या जागेसाठी मनोमिलन?

नवी मुंबईसाठी उरण पनवेल आणि नवी मुंबईतील ज्या बेलापूर पट्टीतील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत त्यासर्व जमिनी या समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील आहेत. येथील जैवविविधता आणि समुद्राच्या नैसर्गिक पाणी निचऱ्याची व्यवस्था ही खारफुटीच्या सहजीवनाची आहे. मात्र विकासाच्या नावाखाली येथील नैसर्गिक प्रवाह बंद किंवा बुजवून त्याठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. परिणामी अनेक ठिकाणी खारफुटीत वाढ झाली आहे. मात्र खारफुटी ही समुद्राच्या लाटा आणि त्सुनामीसारख्या प्रकोपाच्या वेळी होणारी किनाऱ्याची धूप थांबवून किनारपट्टीवर जीव, जंतू प्राणी यांच्या सुरक्षेची महत्वाची भिंत आहे. त्याचे संवर्धन आणि संरक्षण ही मूळ कामगिरी खारफुटी करीत आहे. मात्र हीच नष्ट केली जात आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा – जरांगे यांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता, ‘मराठा मतपेढी’ दिशा देणार

हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

यासाठी पर्यावरणवाद्यांनी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. तसेच आंदोलनेही केली आहेत. त्यासाठी न्यायालयातही भूमिका मांडली आहे. नवी मुंबई नंतर झपाट्याने विकसित होत असलेल्या उलवे नोडमधील सेक्टर २ मधील काही ठिकाणी अशा प्रकारचा मातीचा भराव येथील खारफुटीवर टाकण्यात येत आहे. या संदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद नाही.